नामदेव ढसाळ – किस्सा क्रं. 9

दलित पँथरच्या आंदोलनांना दडपण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने सरळ सरळ दडपसत्रच चालू केले. पँथरच्या नेत्यांना सातत्याने स्वबचावासाठी भूमिगत रहावे लागत होते. नामदेव ढसाळ यांच्यावर अनेक ठिकणी खटले भरले गेले . केव्हाही पोलिसांनी यावे आणि जमा करावे अशी वेळ आली. राजकीय पाठबळ संपुष्टात आलेले. तसेही ते कधी नव्हतेच. सततच्या तारखा, कोर्ट-कचेऱ्या. मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले या कवितासंग्रहात कस्टडीतल्या कविता या सेक्शन मध्ये ढसाळांनी त्यांच्या कस्टडीतल्या अनुभवांना कवितेत बद्ध केले आहे.

अशाच एका खटल्या संदर्भात तारखांवर जावून जाउन घाण झालेली त्यात अगदी जवळच्या नातलगाकडे ते रात्री मुक्कामी आले होते. कारण त्याच ठिकाणी त्यांची दुसऱ्या दिवशी पुन्हा हजेरी होती. परंतू मुक्कामाच्या ठिकाणी थांबलेल्या नातलगानं थोडंसं नाक मुरडतच नामदेवाच्या मुक्कामाला नापसंती दर्शवली. त्यांच्याकडून मिळालेलं उत्तर असं… (नावाचा ,गावाचा उल्लेख मुद्दाम टाळलेला आहे)

“अरे नामदेवा तसा तर तुझ्याप्रती मी नेहमी सकारात्मक होतोच आणि आहेच पण इथे पोलिस आले तर आमचीही बदनामी होईल . आणि तुझी सध्याची गत पाहता तू इथे न थांबलेले बरे .
नामदेवांनी रात्रीच जागा बदलावयाचे ठरवले , एक परिचयातील शिवसैनिक होता तिथेच रात्र काढली .

(सांगायचं तात्पर्य हे नाहीच कि शिवसैनिक किती दर्यादिल वा नामदेवांना किती मानणारे होते पण या नंतर जेव्हा केव्हा नामदेवांना तिथे तारीख असायची ते त्याच्याकडेच राहायचे)
.
या दरम्यान आर्थिक अडचणी , राजकीय मदतीची उणीव , दबाव गट तयार करून केस निकाली काढण्यासाठी कुणी मदत केली ? मदतीचा हेतू , उद्देश प्रामाणिक नसेलही पण मदत कारण-यांची शेवट पर्यंत साथ सोडणार नाही हि पँथर ची भूमिका नामदेवांनी शेवटपर्यंत निभावली . (समाज यावेळी कुठे होता? तेच मित्र आणि इतर पँथर वगळता)

सौजन्य–
प्रा. नारायण कुलकर्णी कवठेकर, अकोला …
प्रा. Jayant Mohod, अकोला …

आंबेडकर 1995

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कविवर्य नामदेव ढसाळ ह्यांच्या कवितेचं केलेलं वाचन.

बॉम्बे हॉस्पीटल : रुम नं. 909

मी जन्माला घातलेला ”सूर्य” सांभाळता आला तर बघ
मी जाताना माझा ”दिवस” इथेच सोडून जाणार आहे
— तनवीर

तनवीर सिद्दीकी यांच्या या दोन ओळींतच ढसाळांची समग्र समष्टी परावर्तित होते आहे. नामदेव ढसाळ आपल्यात नाहीत ही कल्पना करणं सुद्धा शक्य नाही. आज खऱ्या अर्थाने पोकळी निर्माण होणे म्हणजे काय असते याची पुरेपूर अनुभूती आली. मराठी साहित्याला, मराठी कवितेला तीच्या मूळ रुपात जन्माला घालणारा असा महाकवी पुन्हा होणे नाही.

नामदेव ढसाळ नावाचा कोणीतरी नेता आहे हे फार लहान असतानाच कळलं होतं. पण त्या नावामागचा धगधगता अंगार कळण्याएवढी प्रगल्भता असण्याचे ते वय नव्हतंच. एफवाय ला असताना माणसाने पहिल्याप्रथम ही ढसाळांची दिर्घ कविता वाचली होती. कवितेचं असंही स्वरूप असू शकतं ! या चक्रातच मी अडकून गेलो होतो. कविता ही नुसती गुणगुणण्यापुरती नसते. कवितेने शब्द पेटतात आणि तेच शब्द पेटवतात घरे – दारे आणि माणसे सुद्धा. हे ढसाळांच्याच कवितेतून मी शिकलो.

ढसाळांशी पहिली भेट झाली होती ती आयबीएन लोकमतच्या ग्रेट-भेट कार्यक्रमानिमित्त. आयबीएन-लोकमत मध्ये इंटर्नशिप करत असताना ढसाळांना आँखो देखी पाहण्याचा, ऐकण्याचा आणि त्यांच्यातल्या धगधगत्या ज्वालामुखीला अनुभवण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. निखील वागळेंच्या खोचक प्रश्नांना खुमासदार उत्तरे देताना त्यांची झालेली जुगलबंदी मला ढसाळ नावाचा फेनॉमेनॉ समजावत गेली. ढसाळ म्हणजे कुणी पानं-फुलं-वेली.. पक्षी-चंद्र-तारे गिरवित बसणारा कवी नाही. ते एक अनोखेच रसायन आहे. आणि तेथूनच ढसाळांना अभ्यासण्याचा माझा प्रवास सुरू झाला.

ढसाळ गेल्या अनेक महिन्यांपासून कँसरशी झुंजत होते. सप्टेंबर महिन्यात त्यांच्याशी झालेली भेट माझ्या आयुष्याला निश्चितच वेगळं वळण देणारी होती. बॉम्बे हॉस्पीटलच्या नवव्या मजल्यावर त्यानी स्वतः चितारलेल्या मुंबईच्या नग्न लखलखाटाकडे डोळे भरून पाहणारे ढसाळ पहिल्याच नजेरत माझ्या काळजाला चिरून गेले. मुंबईच्या नागड्या वास्तवाच्या जखमा आपल्या कवितेतून रेखाटणारा हा महाकवी आज कँसरशी लढा देतोय तरी देखील त्याच्या डोळ्यांतली चमक अजूनही मुक्त गगनात भरारी घेणारी आहे. त्याच क्षणाला मनात म्हटलं.. बॉस जिंदगी इसी चीज का नाम है.. जियेंगे तो अपने दम पर और मरेंगे तो भी अपने दम पर..

कलमनामाचे संपादक युवराज मोहितेंनी ढसाळांशी माझा परिचय करून दिला तेव्हा मला बाकी काही विचारण्याआधी त्यांचा पहिला प्रश्न होता.. “काय रे काय – काय वाचतोस?” मी उत्तरलो दादा जवळपास सर्वच वाचतो.. उत्तर संपतंय ना संपतंय तोच त्यांचा आवाज गरजला.. “अरे हाड… जिंदगी वाचायला शिक, माणसं वाचायला शिक… माणसातल्या माणुसकीला वाचायला शिक.. आणि ती इतरांना शिकवायचं पण शिक.. जर तुला माणूस वाचता नाय आला तर जिंदगी झाटभरची तुझी..” माणसं वाचली पाहीजेत, त्यांच्यातल्या माणूसकीचा मळा समानतेच्या, सन्मानाच्या फुला-फळांनी फुलवला पाहीजे याचं सोप्या भाषेत शिक्षण देणारा त्यांचा सल्ला माझ्यातल्या विचार करण्याच्या वृत्तीला मूळापासून बदलवून गेला.

बॉम्बे हॉस्पीटलमध्ये एडमिट असताना दादांना भेटायला येणाऱ्यांची सतत रिघ लागलेली असायची. सकाळीच किमोथेरेपीचा डोस संपवून संध्याकाळी दादा त्यांच्या चाहत्यांना भेटायला एकदम तय्यार होऊन बसलेले असायचे. पांढरा शुभ्र शर्ट, मस्त कडक इस्त्रीतील लुंगी, माथ्यावर हलकेच विसावलेला त्यांचा चष्मा, चेहऱ्यावरचा पिकलेला फ्रेंच कट, सोबतीला निरागस पण एकदम खळखळून हसणारं व्यक्तिमत्त्व ते कँसरसारख्या प्रचंड भयंकरातून जात आहेत याची पुसटशी जाणीव देखील होऊ देत नव्हतं. माणसं आणि त्यांच्याशी गप्पा हेच दादांचं खरं टॉनिक होतं. आपल्याला भेटायला येणारी माणसे हीच माझी संपत्ती, त्यांचं प्रेम हीच माझी कमाई असं सांगणारे दादा पायांना प्रचंड सुज असताना देखील तासंतास व्हिल चेअर बसून लोकांशी गप्पा मारत रहायचे.

वाघाच्या त्वेषाने आणि पँथरच्या वेगाने जुलूमी व्यवस्थेवर आसूड ओढणारा पँथर जेव्हा स्वतःच्या भूतकाळात रमायचे तेव्हा मात्र त्यांच्यातला फक्त आणि फक्त नामदेव ढसाळ हा किती निरागस आहे हे जाणवूनच मन गदगदून जायचं. शाळकरी वयातच बसलेले जातीयतेचे दाहक चटके, त्यांचं बालपण, एकाच घरात चार-चार बिऱ्हाडं राहताना यायची गंम्मत, तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आवडलेल्या मुली, त्यांच्या प्रेमात असलेल्या मुली, ढाले-ढसाळ वादांवर टिप्पणी करताना मी स्वतः कुठे कुठे चुकलोय हे सांगताना त्यांनी कधीच कोणताही अभिनिवेष बाळगला नाही. पुण्यात शंकराचार्यांसोबत झालेली झटापट, अनेक प्रकरणात झालेली जेल, भर रस्त्यावर बसलेली पोलिसांची थर्ड डिग्री, दाऊद साधासा चोर असताना त्याला सज्जड दम देऊन मिळवून दिलेला जामीन असो किंवा ढाले – ढसाळ वादत ज. वि. पवार यांनी कायमच ढालेंची बाजू घेतल्याचे मला आश्चर्य जरी असले तरी अजिबात दुःख नाही असे धीरगंभीर आवाजात सांगणारे ढसाळ पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. बावड्याचे प्रकरण असो किंवा दलित पँथर आणि शिवसैनिकांची आमने-सामने झालेली राडेबाजी असो नाहीतर हिरव्या मटणावरचं त्यांचं प्रेम आणि आतड्यांच्या त्रासामुळे आत्ता चव चाखता येत नाही हा सल बोलून दाखवणारा पँथर एकदम खराखुरा वाटायचा.

दादांबद्दल अजून काय बोलावं !! आमच्या पीढीसाठी ते एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. भाषेतून सांडणारा रखरखता अंगार होता. एक कार्यकर्ता म्हणून घडत असताना मनातलं आत्मभान दादांच्या कवितेनेच जागवलं होतं. स्वतःच्या कवितेकडे वळून पाहताना दादा अनेकदा म्हणायचे सत्तरच्या दशकातली स्थिती वेगळी होती. तेव्हा प्रत्येकाच्या जखमा भळभळत असायच्या त्या जखमांना धारधार शस्त्र बनवणं त्या काळाची गरज होती. बाबासाहेबांचा संघर्ष करा हा नारा डोक्यात ठेवूनच आम्ही रचनात्मक साहित्याची निर्मिती केली होती. मात्र आज त्यापुढे जाण्याची गरज असतानाही अनेक नवकवी त्याच बाजातलं लिहीतायेत. काहीतरी वेगळं लिहिण्याच्या नावाखाली सवंगपणाच जास्त करतायेत. अशा कवितांमध्ये ओढून ताढून कंटेपररी लिहिण्याच्या हव्यासापोटी लैंगिक अश्लिलताच जास्त डोकावतेय. अंडरवर्ल्डच्या कविता अंडरवर्ल्डच्या जाणिवेत जगल्याशिवाय समृद्ध बनत नाहीत. जाणीवा प्रगल्भ व्हायला हव्यात ह्या पोरा-पोरींच्या.. कविता इनोसंट असली पाहीजे. अगदी अस्सल असली पाहीजे.

शेवटच्या दिवसात ते पँथरच्या भल्या-बुऱ्या आठवणी लिहिण्यात गर्क होते. त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येकाला त्यांच्या आगामी प्रकाशनातील पँथरच्या भल्या आणि बुऱ्या आठवणी स्वतः वाचून दाखवायचे. हॉस्पीटलमध्ये असताना त्यांनी प्रचंड कविता लिहील्या आहेत. बॉम्बे हॉस्पीटलच्या रुम नंबर 909 मध्ये जणू काही लायब्ररीच उघडलीये असा आभास व्हावा इतकी पुस्तकं, लिखितं, पेपर्स पडून असायची.

मल्लिकाताई दादांनी लिहीलेल्या कवितांचे फाईलिंग करत असतानाचा उत्साह मात्र मला कायम त्यांच्या आणि मल्लिकाताईंच्या संबंधांवर दादांनी किंवा खुद्द मल्लिका शेख यांनी काही तरी बोलावं यासाठी खुणावत असायचा. शेवटी तो क्षण आलाच. चर्चगेटच्या दर्ग्यावरून आणलेली लाल गुलाबाची फुलं दादांना आम्ही देतो न देतोच तेच दादांनी मल्लिका शेख यांना हाक मारली आणि हातातली गुलाबाची फुलं मल्लिकाताईंना देत म्हणाले.. धीस ब्युटिफूल रोझेस फॉर माय लवली लाईफ लाईफ पार्टनर .. आणि ती फुले स्विकारताना मल्लिकाताईंनी त्यांना दिलेली स्माईल ही त्यांच्या अतुट प्रेमाचा ताजेपणाच दर्शवत होती. परंतू हा सीन पाहील्यावर मात्र मीच काही काळ अचंबित झालो होतो. विद्यापीठीत एम. ए. च्या पहिल्या वर्षात असताना मल्लिका शेख यांचं मला उद्धवस्त व्हायचंय हे आत्मकथन वाचलं. नामदेव ढसाळांची अगदी विरूद्ध बाजू डोळ्यांसमोर उभी राहीली होती. आणि आत्ता जे पाहतोय ते वेगळे आहे की काय ? पण जीव जाम खुष होता. दादांच्या आयुष्यातले एकुण एक पैलू त्यांच्या कवितेसारखेच अस्सलपणए उलगडत होते. आणि त्या सर्व क्षणांचा मी साक्षीदार होतो त्यांनी केलेल्या एकुण एक अनुभव कथनाचा मी काही काळ का होईना पण दादांच्या संम्मतीने झालेला एक भागीदार होतो.

पँथर नामदेव ढसाळ चा यल्गार हा कधीच ऊरबडवेपणा नव्हता. मानवमुक्तीसाठी पुकारलेलं मूर्तीमंत बंड होते ढसाळ. ते आयुष्यभर माणसाचे गीत गात राहीले. माणसावर सुक्त रचत राहीले. जखमेतून वाहिलेल्या रक्ताच्या थेंबाथेबातून अगणित सूर्यांना जन्म देत राहीले. व्यवस्थेची उभी आडवी फाडणारा हा महाकवी कायम वैश्विक काव्य रचत राहीला. संबंध मानवी समाज हा फक्त मानवतेचा धागा पकडून आभाळ नावाच्या छताखाली एक व्हावा असं मानवतेचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगणारा कवी आजवर झालेला नाही.

दादांच्या कवीमनाने यल्गाराचा उत्सव साजरा करण्याचे आपल्याला शिकवले. त्यांच्या कवितेने विद्रोहाचे नवे इमले उभारले. काव्यरचनेचे रचित देव्हाऱ्यांचे खांब कलथून टाकणारे शब्द त्यांच्या लेखणीतून पाजळलेत. दादांचं निर्वाण जरी मनाला चटका लावून जाणारं असलं तरी त्यांच्या वादळी क्रांतीचे वारे प्रत्येक मानवमुक्तीसाठी लढणाऱ्या प्रत्येक श्वासात कायम जीवंत राहतील.

वैभव छाया
दिव्य मराठी
दि. 16 जानेवारी 2014

नामदेव आभाळ झालाय…

15 तारखेच्या पहाटे पाच वाजता फोन खणाणला. फोन उचलण्याआधीच कुणकुण लागली होती. दादांचाच काही तरी निरोप असेल. पलीकडून फोन केलेल्या पत्रकार मित्रानं फारच केविलवाण्या आवाजात सांगितलं दादांनी डोळे मिटले रे.. आदल्या दिवशी जेव्हा ढसाळांना आयसीयु मध्ये हलवल्याचे वृत्त कळले तेव्हापासून मनात धाकधूक निर्माण झाली होती. आजच दादांच्या मातीला जाऊन आलो आहे पण मन काही मानेना. दादा आपल्यात नाहीत हे स्विकारायलाच अजून तरी मन तयार होईना.

ज्या नावाने, ज्यांच्या कवितांनी विद्रोहाची व्याख्या नव्याने लिहीली ते नामदेव लक्ष्मण ढसाळ समजून घेणे आणि ढसाळ अनुभवणे हे दोन वेगवेगळे विश्व आहेत. तेंडूलकरांसारखा ग्रेट नाटककार म्हणाले होते की मला ढसाळ चं विश्व समजून घेताना त्याचा विद्यार्थी बनून बसावं लागायचं. ढसाळ जे विश्व जगले ते विश्वच नागडं होतं. ढसाळांनी त्या जगाचा नागडेपणा पांढरपेशी समाजासमोर जशाच्या तसा चित्रित केला. आणि स्वतःच्या भावविश्वात गुरफटलेल्या अभिजन वर्गाच्या मक्तेदारीला जोरदार हादरे दिले.

दादांचं व्यक्तित्व अगदी अस्सल होतं. बेदरकार पणे जगणाऱ्या दादांच्या सानिध्यात येणाऱ्याला दादा अवघ्या पाचेक मिनिटात आपलंसं करून घ्यायचे. त्यांना नव्याने भेटलेल्या कोणत्याही माणसाशी झालेली मैत्री काही क्षणांतच जुनी करून टाकण्याच्या त्यांच्या खेळकर स्वभावाने ते कायमच सर्वांच्याच गळ्यातल्या ताईत बनून राहीले होते. आज त्यांच्या जाण्यानंतरच पोकळी निर्माण होणे म्हणजे काय असते हे खऱ्या अर्थाने उमगत आहे.

दादा स्वतःच एक महाकाव्य होते. परंतू त्या महाकाव्याला वाचणे जेवढे सोपे होते तेवढेच समजायला अवघड देखील. त्यांचे संपूर्ण आयुष्य मुक्तछंदात रचलेल्या कल्पनारम्य काव्यासारखेच होते. म्हणून आत्ताही दादांच्या टिकाकारांना त्यांना कोणत्याही एका ठराविक वैचारिक चौकटित जबरदस्तीने बसवायला यश मिळालेले नाही. त्यांचं एकुण व्यक्तित्वातूनच अन्याय, अहंकार, वर्ण, लिंग, जात, धर्मवर्चस्ववादाविरोधातील चीड प्रकर्षाने व्यक्त व्हायची. व्यवस्थेने अधिष्ठान प्राप्त करून दिलेल्या कोणत्याही विषमतेविरोधात आग पाखडणाऱ्या दादांच्या भाषेत प्रचंड संताप जरी असला तरी त्यात कधीही द्वेषभावना नव्हती. खाजगी बैठकांत बिनधास्त गप्पा मारताना देखील एखाद्या विशिष्ट व्यक्ती समुहाबद्दल कधीच आकस दाखवला नाही.

नामदेव ढसाळ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मिडीयाच्या लाईमलाईट मध्ये राहीले. त्यांचं आजारपण असो अथवा त्यांनी शोषितांच्या राजकारणावर व्यक्त केलेले त्यांचे परखड भाष्य असो. मिडीयाने कायम त्यांना बातम्यांमध्ये का होईना पण जीवंत ठेवले. परंतू त्याच वेळेस नामदेव ढसाळांना आणि त्यांच्यातील वैश्विक दर्जाच्या कवीला कायम जातीच्या स्थितीवादी ओळखीत बांधून ठेवले.

ढसाळ यांची कविता सर्व आयाम, सर्व क्षितिजे मोडणारी होती. त्यांना आंबेडकरी तत्वज्ञानावर जेवढा विश्वास होता तेवढाच विश्वास त्यांना जगभरातील सर्वच क्रांतिकारी महामानवांनी मांडलेल्या तत्वज्ञानावावर होता. त्यांच्या एकुण एक कवितांमध्ये आपल्याला कुठे ना कुठे तरी ते प्रतित होतच आले आहे. तरी देखील त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या सर्वच बातम्यांत त्यांना केवळ दलित कवी म्हणूनच उल्लेखले गेले. दलितपणाची स्थिती, जुलूमी व्यवस्थेखाली दळणं भरडणं त्या माणसानं कधीच सहन केलं नव्हतं. ते आणि त्यांच्या क्रांतिकारी कविता कायमच बंडाचं निशाण फडकावणाऱ्या होत्या. नामदेव ढसाळांचा उदय ज्या कालखंडात झाला त्या काळातील स्थितीवाद आणि आत्ताचं त्यांचं स्थान यात प्रचंड फरक आहे. परंतू जातीय कोनातूनच त्यांची अस्मिता अधिक गडद करण्याचं काम इथल्या पारंपारिक माध्यमांनी अतिशय कसून केलं आहे असा आरोप केला तर बिल्कूल वावगं ठरणार नाही.

ढसाळांवर अलीकडच्या अनेक नव-बुद्धिजीवींनी शिवराळ वगैरे म्हटल्याचं फेसबुकसारख्या सोशल मिडीयावर आढळून आले होते. या तथाकथित नवबुद्धिजीवींमध्ये सोशल मिडीयावरील नवखे लेखक, नवखे इझमवादी यांचाच जास्त भरणा आहे. खरे तर या “बुद्धीजीवी” वर्गाला ‘दलित’ स्थितीवाचक संकल्पनेचा हवा तसा उपयोग करून घ्यायला जमते. परंतू प्रत्यक्षात शोषितांच्या भावविश्वात, त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची साधी इच्छाशक्ती देखील कोणी उराशी बाळगून असल्याचे गेल्या दोन ते तीन दशकात फारच अभावाने आढळले आहे. आपल्या पुढ्यात आलेले नेमक्या वेळी निभावून नेण्याची स्वार्थवृत्ती बळावली आहे. म्हणून ढसाळांचं धगधगतं कोणी जाणून घेत नाही. आणि आपल्या देशात माणूस मेल्या नंतरच त्याची किंमत कळते, असे म्हणतात. माणूस हयातीत असताना कोणी विचारत नाही. पण तो गेल्यावर मात्र सर्व येतात. या दांभिकपणाला काय म्हणावे ? आज ढसाळ नाहीत. त्यांच्यासारखे कवी किती निर्माण होतील, माहित नाहीत. पण शोषितांचे, पिडीतांचे भाव विश्व उलगडवून देणाऱ्या ढसाळांना आपण भाषेच्या नियमात बसवू शकत नाही.

असे शब्दछल करणारे हे नवे नवे मुल्ला बनून बेंबीच्या देठापासून बाँग द्यायला सरसावलेले असतात. आयुष्यात कधीच कोणत्याही चळवळीत प्रत्यक्ष सहभा न घेतलेले हे लोक रस्त्यावरचं विद्यापीठ काय समजून घेणार. स्वतःमधली बूर्झ्वा वृत्ती लपवून आम्ही सुद्धा वेगळे आहोत हे दाखवण्याच्या कोडग्या अट्टाहासापायी जो समोर येईल त्यावर बिनबोभाटपणे अर्थहीन टिका करत बसणे हाच यांचा स्थायीभाव. घरदार सुखी असलं की स्वतःची वृत्ती अभिजन बनत जाते. मग नकळतपणे श्लील – अश्लीलतेचा वाद मनात उभा राहतो. जे शब्द तुम्हाला लिंगवाचक अथवा घाणवाचक वाटतात ते सारेच शब्द या रस्त्याच्या गल्लोगल्लीत वापरून गुळगुळीत झालेले असतात. म्हणून कामाठीपुऱ्यात माणसं राहणाऱ्या चाळीला ढोर चाळ म्हटलं तरी तिथले लोक माणसासारखेच जगत असतात.

असो. हा फरक विश्वभानाचा आहे. ढसाळांच्या निमित्ताने तरी का होईना पुस्तकी शिक्षण हस्तगत केलेले आणि रस्त्यावरचे जगणं शिकलेलं यांत कोठेही समान दुवा वृत्तीने अभिजन असणाऱ्या लोकांना निर्माणच होऊ द्यायचा नाही आहे. त्यांना दलित (माफ करा त्यांना हाच शब्द कळतो) दलित-स्त्रीया यांचे प्रश्न हवेत पण ते फक्त चर्चा करायला. सेमिनार भरवायला. यांना दलितांचे प्रश्न कळतात पण त्यांचे भावविश्व कधीच कळत नाहीत. कारण त्यांना ते समजून घेण्यासाठी लागणारी कोनविरहीत नजरच डोळ्यांना द्यायची नसते. म्हणून ढसाळांना एकाच कोनातून पाहणारे हे दलित प्रश्न समजून घेत असले तरी ते दलित प्रश्नांवर कधीच काम करू शकणार नाहीत. ढसाळ कामाठीपुऱ्यात भाच्याबा नावानं फेमस होते. वेश्याव्यवसायात असलेल्या स्त्रिया सहसा आपलं अंतरंग कोणासाठी खुलं करत नाही. कधीच कोणाशीही अनामिक नातं देखील जोडत नाहीत. पण दादांना त्यांचं अंतरंग जगण्याची पूर्ण मुभा होती म्हणूनच गोलपीठा जन्माला आला.

आयुष्याच्या शेवटपर्यंत दादांना उत्पन्नाचे असे कोणतेच हमखास साधन कधीच गवसले नाही. किंबहूना त्यांनी कधीच ते शोधायचा प्रयत्न देखील केला नाही. उद्याचं उद्या पाहू म्हणत वर्तमानात जगणारा हा अवलिया कधीच कोणत्याही चौकटीत फिट बसला नाही. कारण त्यांचा बाज एका श्रीमंत फकिरासारखाच असायचा. हो फकिरच.. कायम आपल्या अटींवर जगले.. त्यांच्या मनाला ज्या वेळेस जे पटले त्यांनी तेच केले. ते करताना कधीच कोणाचीही भीडभाड बाळगली नाही.

एक वृद्ध कवी, थकलेला माणूस, फसलेला राजकारणी, बेईमान नेता, बाळ ठाकरेंशी दोस्ती करून चळवळीशी दगाबाज झालेला नेता किंवा मल्लिका शेख यांच्या मला उद्धवस्त व्हायचंय च्या अँगलमधून ढसाळांना पाहीले तर ढसाळ कधीच कळणार नाहीत. ढसाळांना नुसते दलित कवी म्हणता येणार नाही त्या काळी ते त्यानी जे भोगलं अनुभवलं ते नागडं सत्य जगापुढे मांडलं. त्या काळी भोगत असलेल्या समाज्याचा त्या यातना जगापुढे त्याच जगाच्या अस्सल भाषेत मांडल्या. ती कवी कल्पना नव्हती ते एक धगधतं सत्य होतं. आज ढसाळ जरी आपल्यासोबत नसले तरी त्यांनी घडवलेली लढाऊ प्रवृत्ती आपल्यासोबत आहे आणि कायम राहील. कारण आयुष्यभर मागास समुहघटकांना आभाळाएवढं मोठं करणारे ढसाळ आज खुद्द आभाळ झालेत. होय आज माझा नामदेव आभाळ झालाय..

वैभव छाया

व्यंगचित्रामागील मानसिकता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरिल वादग्रस्त व्यंगचित्रामुळे देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्याची परिणीती पुण्यात प्रा. पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात झाली. जवळपास सार्‍याच प्रसारमाध्यमांनी एकसुरी प्रतिक्रिया देताना व्यंगचित्रात कोणताही दोष नसल्याचा निर्वाळा दिला. काही पत्रकारांनी पुण्यातील हल्ल्याचा निषेध करताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना चळवळीच्या अभ्यासाचे वावडे असल्याचे  बेजबाबदार विधान देखील करून टाकले. चित्रसाक्षरतेचा मुद्दा उपस्थित करून व्यंगचित्राला विरोध करणार्‍या सार्‍या विरोधकांना चित्र-निरक्षर ठरवले गेले. त्यानिमित्ताने आंबेडकरी चळवळीतील तरुणाईची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया…

समाजातील अपप्रवृत्तींवर मार्मिक भाष्य करण्याचे एक ताकदवर साधन म्हणून व्यंगचित्रे फार मोलाची भूमिका बजावतात.  वर्तमानपत्रे, नियतकालिकात व्यंगचित्रे प्रकाशित होणे हा एक वेगळा भाग असतो. कारण वृत्तपत्रांतील संपादकीय सदरे वाचणार्‍या वाचकांचे विचार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. त्यामुळे क्वचितच एखादे व्यंगचित्र प्रभाव पाडते. परंतू क्रमिक पाठ्यपुस्तकांत एखादे कार्टून छापण्याची परिमाणे ही पूर्णतः वेगळी आहेत. अभ्यासक्रमातील पुस्तकात असणारी प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थ्याच्या मनावर संस्कार करत असते. पाठ्यपुस्तके ही ज्ञानाचे भंडार असून त्यात मांडलेले विचार हे आयुष्यातील प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे मुल्यशिक्षण आपण प्रत्येक इयत्तेत घेत असतो. त्या वादग्रस्त व्यंगचित्रात नेहरु चाबुक उगारताना दाखवले गेले आहेत. संविधान स्विकृतीअगोदर हजारो वर्षे येथील मनूवादी व्यवस्थेने येथील शोषित उपेक्षित आणि वंचिताना कायम पायदळी तुडविले. त्यासाठी चितारल्या गेलेल्या अनेक चित्रांत चाबकाचा वापर सर्रास केला गेला आहे. मग कार्टूनिस्ट शंकर यांनी काढलेले चित्र हे कोणत्या मानसिकतेचे प्रतिक मानण्यात यावे हा पहिला सवाल उपस्थित होतो.

नियमितपणे प्रकाशित होणार्‍या व्यंगचित्राचे आयुष्य हे जेमतेम दिवसभराचे.  अर्थात काही व्यंगचित्रे याला अपवाद आहेत. मात्र  प्रा. पळशीकर आणि डॉ. योगेंद्र यादव यांच्या कमेटीने त्या वादग्रस्त व्यंगचित्राला अजरामर करून टाकले. खरे तर उगारलेला हंटर असलेले ते व्यंगचित्र पुस्तकात टाकण्याची गरज नसताना देखील ते का टाकले गेले याचे समर्पक उत्तर दिले गेले नाही.  या व्यंगचित्राचे समर्थन करता येईल असा एकही ठोस मुद्दा मांडला नाही. बरं जे बुद्धिवादी विचारवंत सदर व्यंगचित्राचे समर्थन करीत आहेत ते या चित्राचा व्हिज्युअल इम्पॅक्ट हा किती विचित्र आहे याकडे ज्या पद्धतीने दूर्लक्ष करित आहेत त्याला काय म्हणावे ?

व्यंगचित्रात चितारलेले हंटर हे हिंसेचे प्रतीक आहे. गुलामांवर अत्याचार करण्यासाठी कायमच हंटरचा वापर करण्यात येई. मग उगारलेल्या हंटरने विद्यार्थ्यांना नेमके काय सुचित करवून द्यायचे असेल ? कोणतेही काम जलद गतीने करवून घ्यायचे असेल तर त्यासाठी चाबकाने फटकावण्याचा विचार पेरणार आहोत काय ? शिक्षक सदर प्रकरण शिकवत असताना व्यंगचित्राची समीक्षा नेमकी कोणत्या अंगाने करत असतील ? त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची नेमकी काय प्रतिमा तयार होत असेल ? ज्या पंडित नेहरू आणि आंबेडकरांनी  हंटरवादासारख्या नीच रुढी आणि प्रवृत्तींना कायम कडाडून विरोध केला त्यांच्याच हातात हंटर दाखवून नेमके काय साध्य होणार आहे या प्रश्नांची उत्तरे आजवर नाही मिळालीत. कदाचित त्या व्यंगचित्राचा उलटा परिणाम बाजूला दाखवल्या गेलेल्या चित्राप्रमाणे देखील झाला असावा. संविधान निर्मितीला उशीर होत आहे असे दाखवणारे चित्र छापताना त्याच्याच अगदी बाजूला कारणीमीमांसा छापणे देखील गरजेचे होते. संविधान सभेची काटेकोर शिस्त, प्रत्येक विषयावर झालेली गहन चर्चा, महिलांना संप्पत्तीचा अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांना करावा लागलेला संघर्ष, मसुदा समितीच्या इतर सहा सदस्यांची निष्क्रियता देखील मांडायला हवी होती.  पण तसे केले गेले नाही. किंवा चित्राचे समर्थन करणार्‍या पत्रकारांनी देखील हे वास्तव मांडले नाही.

एनसाईआरटीने तयार केलेला अभ्यायक्रम पहिल्यांदाच वादात अडकलाय असेही नाही. याआधी १९७७ ते १९८० या जनता पार्टीच्या तर १९९८ ते २००४ मध्ये भाजपच्या सत्ताकाळात सीबीएसईचा अभ्यासक्रम हा हींदूत्ववादी विचारधारेला अनुसरून बनवला गेला असल्याचे आरोप एनसीईआरटीवर झालेले आहेत. जे डॉ. योगेंद्र यादव यांना आपण एक उत्कृष्ट राजकीय समीक्षक म्हणून ओळखतो. परंतू त्यांनी विविध आंदोलनासंबंधी घेतलेल्या भूमिका मात्र प्रतिगामीच राहिल्या आहेत. देशातील सो-कॉल्ड बुद्धिजीवी वर्ग जेव्हा जेव्हा स्व-अस्मिता जागृत करण्यासाठी टोकाची भुमिका घेतो तेव्हा त्यांचे पक्षधर असणारे योगेंद्र यादव हे नेहमी पुढेच असतात. रामलीला साकारताना लोकपालच्या हुकुमशाही अटींचे समर्थन करणारे असो किंवा ओबीसी आरक्षणाला विरोध करणारा सल्ला देणारे लेख लिहीणे असो, जातिनिहाय जनगणनेला विरोध असो किंवा अपूर्ण महिला आरक्षण विधेयकाला दिलेले उथळ समर्थन असो.  यासंदर्भात जेएनयूचे प्रा. तुलसी राम यांनी व्यक्त केलेलं मत दूर्लक्षित करून चालणार नाही. “एनसीईआरटीच्या कमिटीमध्ये सामाजिक न्यायाचे समर्थन करणारा एखादा जरी सदस्य असता तर कदाचित ह्या व्यंगचित्राच्या प्रसिद्धीसाठी संमती मिळालीच नसती.

आत्ता मुद्दा उरला तो प्रा. पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला करणार्‍या सचिन खरात आणि त्यांच्या साथीदारांचा. त्यांनी केलेलं कृत्य हे निंदनीयच आहे. बाबासाहेबांना अस्खलितपणे अभ्यासलेला तरुण कधीच अशा भ्याड हल्ल्यांचे समर्थन करीत नाही. परंतु, सचिन खरात आणि त्यांचे तीन-चार मित्र म्हणजे अख्खा आंबेडकरी तरुण वर्ग नव्हे. बाबासाहेबांच्या संघर्षाचा मार्ग म्हणजे तोडफोड करणे नव्हे. आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासणार्‍या तरुणांची कृती ही कायमच परिवर्तनवादी राहीली आहे. राडेबाजीला थोडेसेही स्थान या चळवळीत मिळू शकणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक सर्वोत्कृष्ट बुद्धिवादी कृतीशील विचारवंत होते. त्यांना आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा दर्जा मिळण्याऐवजी त्यांची ओळख कायम दलितांचे कैवारी अशी बिंबवण्यात इथल्या शिक्षणव्यवस्थेने फार मोठा हातभार लावला. डॉ. आंबेडकर हे देशातील पहिले डॉक्टरेट घेणारे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्या सामुहिक शेतीचा विचार आजच्या काळासाठी परफेक्ट आहे. त्यांचे लोकसंख्या धोरण, जलनीती, नदीजोड प्रकल्प, भाषावार प्रांत-पुनर्रचना पासून ते राजकारणातील रिपब्लिकन पक्षाचे तत्वज्ञान कायमच असपृश्य ठरवले गेले. बाबासाहेबांना विचारात उतरवण्याऐवजी पुतळ्यात बंदिस्त करून टाकले.  बाबासाहेबांना एक व्यक्ती म्हणून नव्हे तर  विचार म्हणून स्विकारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मनूवादी संस्कारांनी लिप्त असलेल्या मेंदूला एकदा रिफ्रेश करण्याची.  

वैभव छाया
9 जुलै 2012

For the Betterment of Atrocity Act

The social atmosphere of entire Maharashtra goes through tumultuous currents caused by casteist hatred as Nitin Aage, 17, a Dalit boy, brutally massacred in Khardha village of Jamkhed Taluka in Ahmadnagar district. The brutality with which Nitin has murdered, it is difficult to measure the level of terror with which he was killed. For last three years, the increased incidences of atrocities are evident in public sphere. It is the same Ahmadnagar district where the wounds of ‘Sonai massacre’ are still fresh in memories. Within few hours of Nitin has massacred, another shameful incidence has taken place in which a corpse of woman, belong to Matang caste (SC), was refused to be cremated in common crematorium in the village. Followed by these incidences, in the same Ahmadnagar district, in Rahata Taluka, in the village of Kilwad, a house of Buddhist family has been ransacked.

In this so called progressive Maharashtra when the incidences of atrocities are reached to its height, no media seems willing enough to speak about it. Though for two years ‘harassment against women’ has been the main agenda, but still news of harassment and atrocities against Dalit women have not been given space in media or deliberately ignored to be given space.  Nitin Aage massacre is the exception.

On one hand, hopelessness of government and governance, and on the other, incidences of atrocities are being suppressed through interventions by politicians’ in the vengeance and the technicalities of judicial processes by whose use perpetrators are left free. Observing all of these, it is evident that the establishments and criminal justice system is biased of caste-patriarchy. Considering the present condition and after meeting and analysing the experiences shared by the activists who have been working for the rights and justice of Dalits, few dreadful facts are come out. These are following……

 

  1. After the incidence has taken, the crime under Atrocity Act is not being registered because of political pressure.
  2. If the crime has registered after struggle, it isn’t getting registered under appropriate IPC Act and clause; instead it is registered under IPCs and clauses which are not much severe.
  3. If the victims is found woman, then it is fully tried to fame her as characterless and weaken the complaint.
  4. There is carelessness in gathering the findings in police investigation.
  5. Victims is threatened and forced to withdraw the complaint.
  6. Victim as well as witness are terrorised by granting immediate bail to accused.

 

Even if the existed law which is there to prevent and control such incidences and if the incidence has taken place then to punish the convicted with severe punishments so that such incidence will not be repeated, the law has been challenged on many places and facts of increased number of atrocities. Consequently, the numbers of atrocities have been increased against Dalits. it is the need of the time to work on the drawbacks within the law so the that such incidence will not taken place future. In this regard, the program is following…

  1. Establishment of Special courts under the provision of article 14:

Amendment of independent and special courts in the law so that home ministry, state government and social justice department will establish special and independent courts for Schedule Caste and Schedule Tribes to bring speedy justice…

  • Case will be fight by public prosecutor in special/independent and fast-track courts.
  • Public prosecutor will be immediately provided to victims according his/her demand
  • To help victim to appeal in high court and supreme court if the case does not reach to conviction.

Concerned department: Home ministry, social justice and law department

  1. Appointment of SC/ST I.A.S officers under SC/ST (PoA) 1989 as Nodal Officer
  • Appoint the care and control committee under the presidency of Chief Minister to prevent the atrocities against SC/ST under article 16 and 17
  • Through care and control committee, on district and district officer level, prevent the atrocity and immediately help the victim to gain justice
  • Those who are related to home ministry and social justice and law ministry, should monitor the implementation of law, twice in a year (January and July) under the presidency of Chief Minister
  • Immediately establish the Care and Control Committee under the presidency of Chief Minister

Concerned department- Social Justice Department

  1. After atrocities are taken place, do not register complaint under IPC 395 against SC/ST
  • After atrocity has been taken place, under pressure, victim is registered against IPC 395 by Y Police Functionaries/department and though victim has already witnessed the atrocity, has to face trouble again. Thus, government/governance should think seriously on this matter and should not register IPC 395 against victim. If this would happen, then appropriate action should be taken against accused who troubles the victims and police who support them.

Concerned department: Home Minister

  1. Obstacles while registering FIR/Complaint, in investigation and filing accusation-affidavit
  • Governance/ Government should vigil over, Delaying in registering the complaint or N.C, not registering complaints under appropriate articles. Do not take complaints of SC/ST PoA 1989 Act, law 1995. Ignore some important facts of incidence, do not write the name of main accuses, threatening the victims, do not arresting the accused immediately, file wrong complaints against victims etc
  • Investigation should be done by DYSP level officers only
  • Do not reject the SC/ST PoA 1989 Act, Law 1995 while filing accusation-affidavit
  • Do not force victims to adjust
  • Accusation-affidavit should file within 90 only without delaying
  • Immediately send the medical report.

Concerned department: home ministry

  1. Compensation should be given immediately
  • Victims should be given enough and immediate compensation as per the law
  • Victim and witness should be given travelling/housing allowance
  • Victim should not be troubled on following causes: no funds for victim, having no caste certificate, if not file the accusation affidavit or victims doesn’t acquire FIR copy or medical report.

Concerned department: social justice and empowerment ministry

  1. Implement the given provisions under SC/ST PoA 1989 Act, Law 995
  • Appoint the Nodal officer on state and district level under the article 9 and 19
  • Take preventive measures under the article 3 (1) (11) to prevent the atrocity
  • Establish special court under article 14. Currently, Gujarat, Madhya Pradesh, Andhra Pradesh, Bihar, Tamilnadu have established such special courts.
  • Establish consciousness awareness centres under article 10 (2), to train the related officer. Counsel the people in atrocity prone area. Consciousness awareness should be done through NGOs. This would be done by, provision of funds, awareness, printing literature, posters, banners, pamphlets etc
  • Action should be taken against office who delays or not performing his duties.

Concerned department: social justice department, home ministry and finance ministry.

By mapping and observing the entire social conditions in Maharashtra for last week and so, it could be noted that the social atmosphere has been polluted. After incidence of atrocity has been taken place, it is obvious to see impatience and turmoil in society. Youth sometime form the extreme views on this. Sometime language of violence could be spoken. But violence cannot solve the incidences of atrocities nor can find any solution. The existing law SC/ST PoA 1989 which is meant to prevent atrocities seems fails on many occasions. The established authorities/governance has always been under suspicion. Therefore if people those who are in the movement go on to take violent measures to gain justice, then it would be no surprise. Government should make provisions to prevent such possibilities, so that in the given incidences, the process of gaining justice and to prevent such incidence will be solve in speedy ways.

Vaibhav Chhaya